शेळी पालनाने आर्थिक विकास चंडकापूर (ता. राहुरी , जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड , योग्य खाद्य व्यवस्थापन , वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी , जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी , ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली. रोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल , याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला. 1) परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन...
शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती स ूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. य...
सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...! फाळेगाव थेट येथील युवा शेतकऱ्यांचा प्रवास. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य ही साध्य होते , हा विश्वास रुजविण्यात फाळेगाव थेट (ता. जि. वाशिम) येथील बालाजी कोरडे हा युवक यशस्वी झाला आहे. 10 वर्षापूर्वी दूधाळ जनावरांची खरेदी करीत हे दूध घरोघरी विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. याच व्यवसायात सातत्य ठेवत त्यांनी पाकीटबंध दूधाचा प्रकल्प उभारला. त्यांचा हा आशावाद निश्चीतच विदर्भातील शेतीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. असे आहे फाळेगाव थेट वाशिम पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फाळेगाव थेट या गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारावर आहे. याच गावातील बालाजी व गणेश कोरडे या दोन भावंडांनी शेतीपूरक व्यवसायासाठी पुढाकार ...
Comments
Post a Comment